Wednesday 5 July 2017

तानाजीचा पराक्रम




तानाजी मालुसरे

तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होताशिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई,दिरंगाई माहीतच नव्हतीशिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिम्मतवान गडीतो अंगाने धिप्पाड ताकदीने भारी आणि बुद्धीने चलाख होतातानाजी म्हणजे महाराजांचा जीव कि प्राणत्यांचा बालपणीचा सवंगडी स्वराज्याचा सुभेदार आणि मूळचा महाडजवळील उमरठ गावचातानाजी सह्याद्रीचा वाघ कुणालाही घाबरत नसेमहाराजांनी सांगावे आणि त्याने काम फत्ते करावे असा शिस्ता पडला होतासूर्यराव सुर्वेला त्याने लढाईमध्ये पळूवून लावले होतेआगऱ्याला महाराजांसोबत तो होताजिजाऊ साहेबाना कोंढाण्याचा सल होताराजांनी तानाजीवर कोंढणत्याची कामगिरी सोपवलीत्या मुलाचे लग्न  होतेपण तानाजी म्हणाला आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचेएवढं बोलून तानाजी शांत बसला नाहीतर त्या स्वामिनिष्ठ सेवकाने पोटच्या पोराच्या लग्नाकडे पाठ फिरवलीआणि कोंढाण्याच्या कामगिरीसाठी 




तानाजी स्ववंगड्याना घेऊन कोंढाण्याच्या दिशेने निघालाप्रथम त्याने गोंधळ्याचे रूप घेतलेआणि गडाखालच्या भागात फिरलाबारीक माहिती गोळा केलीआणि मग सारा बेत पक्का ठरलातानाजीने शंभर मावळ्यांसह उंच सरळ अवघड कड्यावरून घोरपडीच्या मदतीने वर जायचे ठरवलेतानाजीचा भाऊ सूर्याजी पाचशे मावळ्यांसह कल्ल्यान दरवाजाशी यायचेशेलारमामांनी आपली जागा सांभाळायची तानाजी वर पोहोचताच दोघातिघानी गडावर प्रवेश करून दरवाजा उघडायचासूर्याजीने एकदम सर्व सैन्यासह गडात घुसायचे आणि रात्रीच गडकाबीज करायचाहा सारा बेत पक्का झाला  फेब्रुवारी १६७० रात्रीच्या भयाण आंध्रारात तानाजी डोणागिरीच्या कड्यापाशी आलात्या सरळसोट सुळक्यावर तानाजी आपल्या तीनशे मावळ्यांसह चढून गेलात्याचप्रमाणे काळोख्या रात्री त्या उंच खड्या कड्यावरून तानाजीने घोरपडीच्या साहाय्याने गडावर आपले मावळे चढवलेत्यातील दोघातिघांनी रात्री डुलक्या घेणाऱ्या पहारेकर्यांची नजर चुकवून कल्ल्यान दरवाजा उघडण्याची कामगिरी फत्ते केलीत्याबरोबर शेलारमामा,सूर्याची आणि जवळ जवळ पाचशे मावळे किल्ल्यात घुसले

प्रत्येकाची समशेर आडव्या येणाऱ्याची गर्दन उडवू लागली. तानाजी सिहासारखा लढत होताउदेभानने त्याच्यावर झेप घेतलीदोघांची झुंज सुरु झलीइतक्यात तानाजीची ढाल तुटलीत्याने हाताला शेला गुंडाळलाशेल्यावर वार झेलत तो लढू लागलाशेवटी एकमेकांच्या वारांनी दोघेही जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळलेतानाजी पडला हे पाहून मावळे पळू लागलेसूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकलाआणि पाळणाऱ्या मावळ्यांना तो म्हणाला,अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहेतुम्ही असे भागुबाईसारखे का पळता मागे फिरामी कड्यावरचा दोर कापून टाकला आहेकड्यावरून उद्या टाकून मारा नाहीतर शत्रूवर तुटून पडामावळे मागे फिरले घनघोर लढाई झालीमावळ्यांनी गड  सर केलापण गड सर करताना तानाजीसारखा शूर धारातीर्थी पडलाजिजामातेस  शिवरायांना खूप दुःख झालेगड  ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेलाराजे धावत सहगडावर आले त्यांना कळले कि त्यांचा लाडका तान्या त्यांना सोडून गेलाराजांनी हंबरडा फोडला महाराज खूप हळहळले आणि म्हणाले  गड आला पण सिह गेला.







No comments:

Post a Comment