Monday 5 June 2017

शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosale)

शहाजीराजे मालोजी भोसले

शहाजीराजे हे मालोजीराजे यांचे पुत्र  शिवाजीराजे यांचे वडील होतेनिजामशहाने मालोजीराजांची जाहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुगल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला,तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भटवाडी येथे हि प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले,. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी कि खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून  उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली, आणि ते विजापूच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. 
शहाजी महाराज 

आदिलशाहाने त्यांना 'सरलष्कर'हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मरण पावला. त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा  लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले,तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. 

शहाजीराजेचा मुघल आणि आदिलशहा यांच्या बरोबर संघर्ष  

अहमदनगरजवळ मोगलांवरती त्यांनी लढाई जिंकलीत्या वेळी लखुजी जाधव सासरे मोगलांच्या बाजूने लढत होतेनंतर निजामशहाच्या पदरी त्यांना अपमान सहन करावा लागलाकारण निजामाचा वजीर मलिक अंबरला शहाजीराजे यांचा दरारा वाढलेला आवडत नसेशहाजीराजे हे निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीसाठी गेलेशहाजीराजे सरलष्कर झालेशहाजीराजांना वाटत असे कि आपले राज्य असावेत्यांना सुलतानी सत्तेची चीड येईपण त्यांना ती गिळावी लागेआपल्या मराठीपणाचा त्यांना फार अभिमान वाटेमराठ्यांबद्दल त्यांना कळकळ वाटेप्रेम वाटेपण सुल्तानपुढे काही चालत नसेशेवटी त्यांनी आदिलशहाविरुद्ध बंड केलेजिजाऊ गरोदर होत्यात्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवलेहे शहाजीराजे यांचे मोठे धाडस होतेबादशहाने त्यामुळे पुण्याची राखरांगोळी केलीराजे मोगलांना मिळालेशहाजहान याने निजामशाही बुडवण्याचा चंग बांधलाराजे मोगलांना सोडून पुन्हा निजामशाहीत  आले.  पण तेथे निजामशहाचा पराभव झाला
राजे मोगलशाही,निजामशाही  आदिलसाही यांच्याकडे नोकऱ्या आदळलून बदलून करतसुलतान याबद्दल त्यांना काही बोलत नसेकारण त्यावेळी राजांची जरुरी भासत असेनाहीतर तोफेच्याच तोंडी दिले असतेराजांनी निजामशहाचा मुर्तिजा म्हणून लहानसा वंशज घेऊन शहाजीराजांनी त्याला निजाम केले स्वतः वजीर झालेराज्यकारभार पाहू लागलेपरंतु आदिलशहा  शहाजहानने एकत्र येऊन निजामशाही बुडवलीशहाजीराजे नाईलाजाने शेवटी आदिलशहाकडे नोकरीला गेले

शहाजी राजांची कर्नाटकात रवानगी  

शहाजान बादशहाने आदिलशाहला सांगितले कि शहाजीला पुण्यात ठेऊ नकात्याने शहाजीराजांना बंगलोरात पाठवलेशहाजीराजांचे मराठेशाहीचे राज्य बनवण्याचे स्वप्न वाया गेले नाहीत्यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी ते पूर्ण केलेस्वराज्यासाठी शहाजीराजे यांनी मोठा त्याग केला होताजिजाऊंवर पुणे जहागीर  लहानग्या शिवबाची जबाबदारी सोपवुन ते बंगळूरची जहागिरी सांभाळत असतदि२३ जा. १६६४ ला ते मरण पावलेत्यांची समाधी कर्नाटकमध्ये आहे.

No comments:

Post a Comment