Sunday 2 July 2017

शिवाजी महाराजांची अर्थनीती






शिवरायांची अर्थनीती


शिवकालीन आर्थिक जिवणं हे मुख्यतः शेतीव्यवसायाशी निगडित होतेत्यामुळे शेतीचे रक्षण  सवंर्धन हि धोरणे शिवरायांनी प्रामुख्याने राबवलीशेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा होतातो काळ सुलतानी जुलूम जबरदस्तीचा होताअशा वेळी शिवरायांचे स्वराज्य हे लोकांना वरदानच होतेमुख्य म्हणजे शिवरायांचा स्वराज्याचा मुख्य दृष्टिकोन हा शोषणावर आधारीत नव्हतास्वतःची तुंबडी भरून घेण्यासाठी राजांनी स्वराज्य निर्माण केले नव्हतेस्वराज्याला धर्माची जोड होतीपीक लावणीच्या काळात शेतकऱ्यांना विशेष संरक्षण दिले जाईशेतकऱ्याचे नुकसान ते स्वराज्याचे नुकसान हे राजांना पक्के ठाऊक होतेशेतकरी गाव सोडून जाऊ नये याची काळजी राजना घ्यावी लागेएका चोराला शेतकऱ्याने पकडून बेदम मारलेतेव्हा तो चोर मारला गेलाराजांनी शेतकऱ्याची प्रशंसा केली  चोरांचे प्रेत वेशीवर टांगून ठेवण्यात आलेरायतेवाचून स्वराज्य म्हणजे आत्म्यावाचून शरीरशेतकरी हा स्वराज्याचा आत्मा होतासुलतानी बरोबरच रयतेला आस्मानालाही तोंड द्यावे लागेअसाच एक भयंकर दुष्काळ १६३० साली पडला होतामहाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या ह्या दुष्काळाने मरण पावलीतुकाराम महाराजांची प्रथम पत्नी  दोन मुले या दुष्काळाने खाल्लीत्यावर तुकाराम महाराज म्हणतातबरे झाले देवा निघाले दिवाळे | बरी या दुष्काळे पीडा केली || माणसांनी माणसाला खाल्ले असे दुष्काळाचे भयंकर वर्णन आहेशिवरायांनी प्रजेसाठी बंधारे बांधलेकालवे  विहिरी यांची सोय केली


 पाणीनियोजनासाठी जनतेला उत्तेजन दिलेपाण्यावर मालकी सरकारची आहेपुणे जवळ येसाजी पाटील यांनी राजांच्या हुकुमावरून पाणवठ्यांमधील एक मोठा धोंडा फोडलात्याला बक्षीस म्हणून राजांनी जमीन दिलीशिवकालामध्ये जमिनीच्या प्रतीवर शेतसारा ठरत असेशिवाय पिकांच्या पद्धतीवर देखील ठरत असेऊस,हळद,भाजीपाला  फळफळावळे या उत्पादनांवरती नकादि कर आकारला जाई . रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नकाअसा सैन्याला पक्का आदेश होताकल्याण भिवंडी प्रांतात उत्कृष्ट प्रतीचे जहाज बांधणीचे  इमारतीचे लाकूड मिळत असे म्हणून राजांनी कल्ल्यांला आपला जहाजबांधणीचा कारखाना काढलाआंबा,फणस,साग,वड पिंपळ इत्यादी उपयुक्त झाडे परवानगीशिवाय तोडू नये असा आदेश होतापरमुलुखातून साग  इतर कच्चा माल आयात केला जात असेशिवाय स्वराज्याच्या रक्षणासाठी गनिमी काव्याची जंगलाचा वापर नायसर्गिक तटबंदी म्हणून केला जाईमहाराजांनी उदयोगधंद्यांना प्रोत्साहन दिलेबारा बलुतेदारी त्या काळी विशेष प्रचलित होतीखेडे हा आर्थिक जीवनाचा पाया होतात्या काळी खेडी हि स्वावलंबी होतीप्रत्येक खेडे हे एक कुटुंबरचना होतीग्रामीण उत्पादन गावातील लोकांसाठी गावातच केले जाई.सोनार,लोहार,तांबट,सुतार,चांभार,कुंभार,कोष्टी,बॅँकारी,मांग,तेली,धनगर,कोपटी,शिंपी,न्हावी,परीट,गवंडी,माळी,कोळी,रंगारी,पखवाजी,पावेकरी,टाळकरी,विणेकरी,कीर्तनकार,गायक,नर्तिका,गारुडी,तांबोळी इत्यादी अठरा पगड जातीचे लोक आपापला व्यवसाय गुण्यागोविंदाने करत असतराजे नेहमीच कर्माला जास्त प्राधान्य देत असत

त्यांना एकाच जात ठाऊक होतीमाणुसकी गावामध्ये आठवड्याला बाजार भारत असेत्या बाजारामध्ये गावातील  शेजारील गावातील विक्रते आपला माल विकू शकतराजांनी रायगडावर अशीच एक बाजारपेठ बांधली होतीकोकण  घाट यांच्या दरम्यान विशाल सह्याद्रीची रांग आहेफार प्राचीन काळापासून या दोहोंना जोडणारे घाट अस्तित्वात होतेपायवाटा होत्यानाणेघाट,थळघाट,बोरघाट,आंबाघाट इत्यादी घाटांमधून मालाची ने आन होईया घाटांमध्ये शिवरायांनी जकातीची चौक्या बसवल्या होत्याघाटांचे रक्षण  नियंत्रण डोंगरी किल्ल्यामार्फत केले जाईमालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने बैलगाडी,घोडागाडी  गाढव यांचा उपयोग केला जाईपालखीचा उपयोग श्रीमंत लोक करीत असतराजांनी स्वदेशी कारागिरांना नेहमीच चालना दिलीघाटमाथ्यावर पोर्तुगीजांनी केलेले मीठ सर्रास विकले जात होतेराजांनी पोर्तुगीज मिठावर जबरदस्त जकात बसवली कोकणच्या मिठाला देशाची बाजारपेठ मिलवून दिलीस्वराज्यात शोषणाचे प्रमाण जवळपास बंदच झाले होते.चौल,कल्याण,भिवंडी,दाभोळराजापूर,वेंगुर्ले,हि उद्योगधंद्याची केंद्रे म्हणून भरभराटीस आलेली होतीयेथे अन्नधान्य मसाल्याचे जिन्नस कापड कापड फळे प्राणी विक्रीसाठी ठेवलेले असतमहाराजांनी गुलामच व्यापार बंद करून टाकलाशिवरायांनी मस्तक,एडन येथे व्यापार कारण्यासाठी गलबते बांधली होतीमहाराजांचे एक गल बत एडनहून मुंबई बंदरात .१६६९ साली दाखल झाल्याची बातमी सुरतेच्या इंग्रजी दफ्तारात होती

राजांनी क्चच्या मालाची आयात  पक्क्या मालाची निर्यात हे धोरण ठेवले होतेघोडदळास उत्तम अरबी घोडे हवे असतठाण्याजवळील घोडबंदर हे घोड्यांच्या आयात=निर्यातीचे बंदर म्हणून नावाजलेले होतराजांनी डच,फ्रेंच यांच्यापासून स्वराज्याला कसा फायदा होईल ते पाहिलेइंग्रज हे फार धूर्त होतेइंग्रजांनी आपले चलन स्वराज्यात चालू द्यावे हि महाराजांना विनंती केलीराजांनी ती धुडकावून लावलीइंग्रज व्यापाऱ्याबद्दल राजे सावध असतत्यांना ठाऊक होते कि यांच्या व्यापारी टोपीखाली राजकारण शिजत आहेइंग्रज १६५० सालमध्ये राजांच्या चळवळीला गुंडगिरी,गुंडगिरी म्हणून चिडवत होते.१६६० ते १६७० मध्ये ते राजांना मोठा बंडखोर म्हणून संबोधू लागलेआणि १६७४ साली राज्याभिषेख झल्यावर इंग्रजाना साक्षात्कार झालाशिवाजी राजा हा मोठा धोरणी आहेअसे इंग्रजांना वाटू लागले होतेइंग्रज हे अव्वल दर्जाचे व्यापारी होतेजिथे फायदा तिकडे धाव घेत असतपण हे सर्व खटाटोप ते कंपनीसाठी करत होतेइंग्लंडच्या तळागाळातील जनतेसाठी नव्हे.  राजांसारखी रयतेची काळजी घेण्याइतपत ते अजून प्रगल्भ झाले नव्हतेमहाराजांसारखे अस्सल राजकारण त्यांना अजून साधले नव्हतेसुरत  इतर सुलतानी शहरांवर महाराजांनी धाडी घातल्या कारण स्वज्याचे रोपटे अजून लहान होतेत्याला फळे येण्यास अद्यापि बराच कालावधी होताशिवाय स्वराज्याचे परकीय सुल्तानापासून संरक्षण करायचे होतेरयतेची मने हि स्वराज्याला लोकशाहीला अनुकूल घडवायची होती

रायतेमध्ये स्वावलंबन उदयमता राबवायची होतीस्वराज्याची शेती व्यवस्था टिकवणे उद्योगधंद्याच्या शिवकालातील वाढीस प्रोत्साहन देणे हि कामे अग्रक्रमावर होतीआणि हे सर्व लोकांची मने सांभाळून करायचे होतेसुल्तानांसारखे बेजबाबदार राहून चालणार नव्हतेअचानक सुलतानांची टोळधाड कधी होईल याचा भरवसा नसायचा.  शेतीव्यवस्था सुलतानी  आस्मानी या दोघांमुळे भरडून निघत असेस्वराज्याची बरीच कामे पैशावाचून अडली होतीअशाकाळी सुलतानी शहरे हि पैशाने ओसंडून वाहत होतीश्रीमंत शहरांमधील बाजारपेठा ह्या रयतेच्या हातात नव्हत्यासुलतान लोकांच्या हातात होत्याबादशहा  त्याचे हितचिंतक यांनी रयतेची पिळवणूक करूनच आपली तुंबडी भरली होतीशिवाय हे जुलमी सुलतान स्वराज्याची नासाडी करत,लोकांवर जुलूम करत त्यांच्यावरही अंकुश बसने आवश्यक होतेस्वराज्याला विपुल धनप्राप्ती  सुल्तानांवर वचक हा दुहेरी हेतू या धाडीमधून साध्य होत असेम्हणून राजांनी ह्या श्रेमांत शहरातील श्रीमंत लोकांकडूनच खंडणी वसूल केलीगरीब रयत स्त्रिया मुले यांच्या केसालाही धक्का लावला नव्हताशिवाजीराजांचा पोर्तुगीज चित्रकार म्हणतो कि शिवाजीराजा आपल्या सैनिकांना चांगला पगार आणि तो सुद्धा नियमित देत असेयात हेतू असा होता कि युद्धात मिळवलेली लुट लपवण्याचा मोह त्यांना होऊ नयेशिवरायांचा राज्याभिषेक झाला

त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याचे चलन म्हणून शिवराई होणं हे सुवर्ण नाणे प्रचालात आणले होतेत्यावर श्री राजा शिवछत्रपती असे कोरले होतेशिवरायांचे शेतकऱ्यांबद्दल धोरण असे होते,नवी रयत येईल त्यास गुरे ढोरे द्यावीबिजास दानापैका द्यावातो ऐवज दोहो चोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावाये जातीचे रयतेचे पाल ग्रहण करावेसरकारी कर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्वानाच दफ्तारात जमा करावा लागेधर्मादाय संस्थांना मात्र  कारातून सूट होतीत्यांच्यासाठी राजांनी वर्षासने इनामे,जमिनी लावून दिली होतीधर्माशिवाय जनता कर्माला प्रवृत्त होत नाहीहे राजांच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीला केव्हाच ठाऊक झाले होतेशिवकालामध्ये माणसाच्या गरजा कमी होत्यात्या गरजा सर्वसाधारणपणे पूर्ण होत असतलोक गरजांच्या रगाड्यात अडकत नसतरयतेची भरभराट झाली तर राज्यकारभार सुसह्य होईल ह्या विचाराने शिवरायांनी शेती  उद्योगधंदे यांच्याच पाठपुरावा केलाशिवरायांनी स्वराज्याचा महान अर्थ जाणला होता तो अर्थ आपल्या अर्थनीतीमध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला होताशिवराय हे येक थोर अर्थतज्ञ् होते आई महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होतीमहाराजांनी हा वारसा आपल्या आईकडून घेतला होताजिजाआऊसाहेब कैलासवासी झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या शिवबाची एक कोटी साठवून ठेंवले होतेराजांची अर्थनीती हि त्याग,कष्ट,परिश्रम,बचत यावर उभारलेली होतीसुलतानी भंपकपणा,दिखाऊपणा,खर्चपनाचा त्यात लवलेशही नव्हता.








No comments:

Post a Comment