Thursday 15 June 2017

प्रतापगडचा रणसंग्राम




अफजल खानाचा वध

विजापूरच्या दरबारातील गोष्टशिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडलादरबारात झाडून सारे सरदार गोळा झालेएकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात हजर होतेआदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होतीदरबारापुढे महत्वाचा प्रश्न  होता 'शिवाजीचा बिमोड कसा करायचा ? बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला.''सांगा,कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला ?''दरबारात शांतता पसरलीजो तो आपल्या जागी चूप  शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार ? जो तो एकमेकांकडे बघू लागलाएवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आलात्याचे नाव होते अफजलखानखानाने विडा उचलला  तबकाडीतील विडा उचलत अफजल खान म्हणाला,''शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा  सापडला तर त्याला ठार मारून विजापूरला आणतोअफजलखान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदारतुफान ताकदीचा  पोलादी पहार हातांनी वाकवणाराभल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा  अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचललासारा दरबार खुश झाला


दरबारात हजार असलेल्या प्रत्येकाला वाटले 'आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात सखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार,नाहीतर त्याचे मुंडके दरबारात सादर होणार.अफजलखान मोठ्या ऐटीने,थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडलात्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज  लढाईचे सामान घेतलेयापूर्वी अफजलखान बारा वर्षे वाईचा सुभेदार होतात्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होतीमोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला.   शिवराय त्या वेळी राजगडावर होतेत्यांना अफजलखान चालून येत आहे हि बातमी कळलीस्वराज्यावर मोठे संकट आले,हे त्यांनी ओळखले,पण ते डगमगले  नाहीत. त्यांनी विचार केला खान कपटीत्याची फौज मोठीआपले राज्य लहान,आपले सैन्य लहान.उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाहीत्याच्याशी युक्तीनेच सामना केला पाहिजेअसे शिवरायांनी ठरवलेते जिजामातेशी सल्लामसलत करून,तसेच त्यांचा आशिर्वाद घेऊन गडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले.शिवराय प्रतापगडावर गेले,हि बातमी खानाला कळताच तो चिडलात्याला माहित होतेप्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही,कारण तो किल्ला डोंगरातभोवताली घनदाट जंगल होतेवाटेत उंच उंच डोंगर होतेफौजेला जायला चंगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हताशिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता

शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे,म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केलीतुळजापूर,पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिलाररयतेचा खूप छळ केलाहे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील  बाहेर येतील,असा खानाचा डाव होताशिवरायांनी खानाचा डाव ओळखलात्यांनी प्रतापगड सोडलाच नाही,तेव्हा खानाने दुसरा डाव टाकलाप्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला,'तुम्ही माझ्या मुलासारखेमला भेटायला याआमचे किल्ले परत परत द्यातुम्हाला मी आदिशाहाकडून  सरदारकी देववितोखान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे,हे शिवरायांनी झटकन ओळखलेते सावधगिरीने वागत होतेत्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला.शिवरायांनी खानाला निरोप पाठवला,'खानसाहेबमी तुमचे किल्ले घेतलेमी अपराधी आहेमला क्षमा कराआपणच प्रतापगडाखाली भेटायला यावेमला तिकडे येण्याची भीती वाटतेशिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसलावा  बहोत खुशी. आपली दाढी कुरुवाळात तो म्हणालात्याला वाटले,या अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद  हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो  आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे  बस्स खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला.भेट ठरली  प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरलीदिवस ठरलावेळ ठरलीभेटीच्यावेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या  ठिकाणी दूर ठेवावे

असे ठरलेमहाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करवून घेतलीभेटीसाठी छानसा शामियाना उभारला . शिवराय फार सावधगिरीने वागत होतेत्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्याजंगलात कोणी कोठे लपून राहायचे,काय करायचे,याबद्दल त्यांना सूचना दिल्याकडेकोट बंदोबस्त केलाखान कपटी आहेशिवरायांनी त्याची भेट घेऊ नये,असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले,पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले.भेटीचा दिवस उजाडलासकाळी शिवरायांनी भवानीदेवीचे देर्शन घेतलेथोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केलीपायांत सुरवर चढवलीअंगात चिलखत घातलेत्यावर जरीचे कुडते  अंगरखा घातलाडोक्यास जिरेटोप घातलात्यावर मंदिल बांधलाडाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चढवलीत्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवलासोबत पटटा घेतलाशिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झालेबाहेर सरदार उभे होतेशिवराय त्यांना म्हणाले ''गड्यानो,आपापली कामे नीट कराभवानी आई यश देणार आहे,पण समजा आमचे काही बरेवाईट झालेतर तुम्ही धीर सोडू नकासंभाजीराजांना गादीवर बसवामासाहेबांच्या  आज्ञेत वागास्वराज्य वाढवारयत सुखी कराआम्ही निघालो '' शिवराय निघाले

बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला,संभाजी कावजी,येसाजी कंक,कृष्णाजी गायकवाड,सिद्दी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते.खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होतामनोराज्य करत होतात्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होतातो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता.शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आलेबडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिलेखानाने महाराजांच्या वकिलाला विचारले,''शिवाजीराजे आत का येत नाहीत ''वकील म्हणाला,''ते बडा सय्यदला भितातत्याला तेवढा दूर करा ''बडा सय्यद दूर झालाशिवराय आत गेले.खान उठून म्हणाला,''या राजे,भेटा आम्हाला.महाराज सावध होऊन पुढे झालेखानाने शिवरायांना आलिंगन दिलेधिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होतेशिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आलेत्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केलाशिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटलाअंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावलेत्यांनी खानाचा डाव ओळखलाअत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केलाडाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसलाखानाची आतडी बाहेर पडलीखान कोसळला.




No comments:

Post a Comment